शेतातील बांधावरून दोन गटांत तुंबळ मारामारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- राहुरी तालुक्यात शेतातील बांधावरून घोरपडवाडी येथील जाधव व बाचकर कुटुंबात मारामारी झाली. परस्परविरोधी फिर्यादींवरून दोन्ही गटांतील आठ जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कुशीनाथ जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे, आमच्या शेतात सकाळी आठ वाजता नांगरट करत असताना विठ्ठल सटुबा बाचकर, रामदास विठ्ठल बाचकर,

लहू विठ्ठल बाचकर, अंकुश विठ्ठल बाचकर यांनी ‘तू सामाईक बांध कसा फोडला?’ असे म्हणून कुऱ्हाड व काठ्यांनी जबर मारहाण केली. या फिर्यादीवरून बाचकर कुटुंबातील चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्जेराव जाधव, नानासाहेब जाधव, नितीन जाधव, उत्तम जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment