नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत – आमदार चंद्रकांत पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- पुण्यातील कोथरूड येथे आमदार चंद्रकांत पाटील यांचा हस्ते दिव्यांगाना मदत देण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी चंद्रकांत पाटील हे माध्यमांशी बोलत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धावता प्रवास करून उपयोग नाही. ते मुख्यमंत्री आहेत त्यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे.

त्यांनी कोरडा प्रवास करून उपयोग नाही असे म्हणतं. देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास हा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आहे. विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी फडणवीस प्रवास करत आहेत.

तसेच शरद पवार यांच्याबद्दल मला कायम आदर आहे, पण त्यांना वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागते, याच वाईट वाटते असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

त्याचबरोबर नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत तसेच आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल,

भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment