निवडणुकीचे बिगुल वाजले…गावोगावी रंगणार निवडणुकीचा फड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा काळ सुरु असल्याने गेले काही दिवसांपासून देशातील काही निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. यातच काही दिवसांपूर्वी बिहार निवडणुकीचे रणशिंग फुकण्यात आले होते.

राज्यातील जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, कोरोनामुळे तो स्थगित करण्यात आला होता.

मात्र आता स्थगित करण्यात आलेला हा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशाने सुरू होणार आहे. प्रभाग रचनेच्या अंतिम टप्प्यानुसार प्रांताधिकार्‍यांकडून प्राप्त झालेले

प्रस्ताव तपासून प्रभाग रचना आणि आरणक्षणाला अंतिम मान्यता देणे आणि त्यावर जिल्हाधिकारी यांना सही करण्यासाठी दि. २७ ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडून मान्य करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचनेला नमुना अ मध्ये दि. २ नोव्हेंबर रोजी व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल.

राज्य निवडणूक विभागाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी याबाबतचे आदेश आजच काढले आहेत. मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींची राज्यातील संख्या काही हजारात आहे.

त्यामुळे आता गावागावात निवडणुकांचा फड रंगणार आहे. येत्या पंधरा दिवसानंतर निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment