पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-मागील दोन दिवसात परतीच्या पावसाने मागास सोयाबीन, बाजरी, मका व कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण जातीने प्रयत्न करू,

अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, मका तसेच कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले.

या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारने आजवर शेतकरी हिताचे निर्णय घेतले.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. याप्रसंगी सभापती पौर्णिमा जगधने, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,

हरिभाऊ शिंदे, गोरक्षनाथ जामदार, विष्णू शिंदे, नितीन शिंदे, अनिल दवंगे, सुनील गिरमे, प्रदीप बंब, ज्ञानदेव दवंगे, सुनील दवंगे, सुहास दवंगे, काकासाहेब शिंदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment