किसान सन्मान योजनेमध्ये अपात्र लाभार्थ्यांनी केली कोट्यवधींची फसवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  सुमारे दोन वर्षापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केली होती.

आता याच योजनेमध्ये काही अपात्र धारकांनी शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पारनेर तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये

सुमारे दोन हजार 367 करदाते व 219 अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन सरकारची कोट्यावधी रूपयांची फसवणुक केल्याचा धाकदायक प्रकार उघडकीस आला आहे.

या योजनेत सहभागी होताना कोणत्याही प्रकारे संबधीत अधिकाऱ्यांनी दक्षता न घेतल्याने या योजनेत कोट्यावधी रूपयांचा गैरव्यहवार झाला आहे.

आता या अपात्र शेतकऱ्याकडून सुमारे दोन कोटी 26 लाख 14 हजार वसुल करण्याचे आदेश सरकारी पातळीवरून प्रातांधिकारी व तहसीलदार यांना आले आहेत.

त्यामुळे वसुलीसह ज्या शेतक-यांनी सरकारची फसवणुक करून लाभ घेतला त्यांचेही धाबे दनाणले आहेत. दरम्यान या योजनेअंतर्गत प्रती शेतकरी प्रती वर्षी सहा हजार रूपयांचा लाभ देण्यात येतो.

ही रक्कम तीन टप्यात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी हा करदाता नसावा तसेच नोकरदारांना 10 हजार रूपयांपेक्षा अधिक निवृत्ती वेतन नसावे,

तसेच आजी माजी मंत्री आमदार, खासदार, राज्यसभा सदस्य, जिल्हा परीषद सदस्य, सरकारचे निवृत्त अधिकारी, डॉक्टर, वकील यांना या योजनेतून वगळण्यात आले होते.

मात्र तरी सुद्धा अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेत गरजू व अनेक गरीब शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ मिळाला नाही. फक्त हुशार व चलाख अशा अनेक बोगस लाभार्थींना मात्र याचा लाभ घेतला आहे.

आता वसुलीचे आदेश आल्यानंतर मात्र बोगस लाभार्थींचे पितळ उघडे पडले आहे. आता या वसुलीचे मोठे अव्हान तहसीलदार व संबधीत यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment