स्वस्त धान्य दुकानदाराने १५० ग्रॅम हरभरा डाळ कमी दिल्याची तक्रार

Published on -

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- कर्जत येथील अर्बन सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात हरभरा डाळ प्रतिकार्ड तीन किलोत १५० ग्रॅम कमी देण्यात येत आहे. डाळ खराब आल्याचे कारण सांगण्यात आले. ग्राहकांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली.

सुरूवातीला डाळ आली नसल्याचे दुकानदाराने सांगितले. नंतर तीन किलो हरभरा डाळीची चिठ्ठी देण्यात आली. दोन दिवसांपासून वाटप सुरू करण्यात आले.

गुरूवारी प्रत्येक रेशनकार्डवर १५० ग्रॅम डाळ कमी दिली जात होती. विचारणा केली असता डाळ खराब आल्याने १५० ग्रॅम कमी देण्याबाबत आम्हाला वरून सांगितले असल्याचे मापाड्या सांगत होता.

याबाबत तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता धान्य कमी द्यायला कोणीही सांगितले नसून त्यांनी पूर्ण धान्य दिले पाहिजे, प्रश्न डाळ खराब आली असेल, तर बदलून देऊ. त्यामुळे कमी देणे चुकीचे आहे, असे नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!