नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले थोरात; प्रशासनाला दिले आदेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

यामुळे हतबल झालेल्या बळीराजाच्या मदतीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे धावले आहे. त्यांनी नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

दरम्यान इंद्रजित थोरात यांनी पठार भागात शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पठार भागातील अनेक गावांना त्यांनी भेट दिली.

यावेळी इंद्रजित थोरात म्हणाले कि, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार तूर, सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांचे मोठे नुकसान झाले असून या सर्वांचे तातडीने पंचनामे करण्यात येणार आहेत.

तसेच महाविकास आघाडी सरकार या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने जास्तीत जास्त मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment