मुळा धरणातून नदीपात्रात सोडले पाणी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी जिल्ह्यावर वरुणराजाची चांगलीच कृपादृष्टी राहिली. यामुळेच कि काय दुष्काळग्रस्त म्हणून हिणवल्या जाणाऱ्या नगर जिल्हा यंदा हिरवळीने नटला आहे.

तसेच जिल्ह्यातील नद्या, धरणे तुडुंब भरले आहे. नुकतीच राहुरी तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुळा धरणातून ५ हजार क्‍युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

आतापर्यंत धरणातून जायकवाडी कडे १५ हजार १५४ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असलेल्या पारनेर भागातून आणि

कोतुळ खालील भागातून धरणाच्या लाभक्षेत्रात पाण्याची आवक सुरू आहे. पाटबंधारे खात्याने पाण्याचा विसर्ग २ हजार क्युसेकवरून ५ हजार क्युकेस करण्यात आला आहे.

नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत मुळा धरणात ३७ हजार १६८ दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद झाली आहे.

२६ हजार दशलक्ष घनफूट पाण्याची पातळी स्थिर ठेवून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे, असे धरणाचे अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment