भाजपचे ‘हे’ खासदार म्हणतात , शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? ते तुम्ही ठरवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-  खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार झाल्यानंतर अनेक मोठ्या कामांना हात घातला. त्यांचा अभ्यास आणि त्यांची टोलेबाजी करण्याची शैली सर्वश्रुत आहेच.

त्यांनी आपल्या याच खास शैलीत टाकळीकाझी (ता. नगर) येथे फटकेबाजी केली. नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी टाकळीकाझी येथे झाले.

यावेळी खासदार डॉ.सुजय विखे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही टीका केली. यावेळी ते म्हणाले की, ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत.

त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर हे आता जनतेनेच ठरवावे,’ असे वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

‘भविष्यकाळात कोण खरे ठरते, हे निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही,’ असा दावाही त्यांनी केला आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारला एक वर्ष होत आले आहे.

त्यांचे हे वर्ष पाहिले तर कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही. फक्त पत्रकार परिषदा, प्रवेश प्रक्रिया, घोषणाबाजी, नारळ फोडणे, फोटो काढणे एवढेच या सरकारचे काम आहे.

वास्तविक राज्य सरकारमुळे भ्रमनिरास झाला आहे,’ असा आरोप खासदार डॉ.सुजय विखे यांनी केला. ‘हे लोकनियुक्त सरकार नसुन षडयंत्र सरकार आहे, आणि षडयंत्रच्या सरकारकडून सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस मिळतील, असे मला वाटत नाही.

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे लोकनियुक्त सरकार असून तेथे जनतेला योग्य न्याय मिळत आहे. ज्यावेळी महाराष्ट्रात लोकनियुक्त सरकार येईल, त्यादिवशी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल,’ असेही विखे यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment