‘केंद्राचा निधी आहे म्हणून गावांना वैभव प्राप्त होतंय’ ; खा.डॉ. विखे म्हणतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- सध्या जिल्ह्यातील काही ठिकाणी रस्ते कामास वेग आला आहे. काहींचे भूमिपूजन सुरु आहे. काष्टी येथे न्हावरा ते आढळगाव पर्यंतच्या 216 कोटी 51 लाख खर्च अपेक्षित कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. 

हे भूमिपूजन खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी आपल्या याच खास शैलीत येथे आपल्या भाषणात फटकेबाजी केली. गावचा खरा विकास केंद्राच्या निधीतूनच सुरू आहे, केंद्राचा निधी आहे म्हणून गावांना वैभव प्राप्त होतंय असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नगर ते दौड व न्हावरा ते आढळगाव पर्यतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागले आहे.

आता आढळगाव ते जामखेड दरम्यानच्या कामासाठी 430 कोटीचा खर्च अपेक्षित आहे हे दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.  नगर दौंड राष्ट्रीय महामार्गाचे काम

माजी खासदार दिलीप गांधी व आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नाने झाले आहे. चार राष्ट्रीय मार्ग श्रीगोंद्यातून गेल्याने श्रीगोंद्याला वेगळे वैभव प्राप्त होणार आहे. केंद्र गावचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment