राज्य सरकारने जनतेला जास्तीत जास्त मदत करावी – पंकजा मुंडे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकरीही अतिवृष्टीमुळे संकटात सापडले आहेत.

राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत संकटकाळात जनतेला करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या कि, राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेले पॅकेजचे मी स्वागत करते.

मात्र याहून अधिक मोठे पॅकेज देणे अपेक्षित होते. केंद्र सरकारही मोठी मदत सर्व जनतेला या संकटकाळात करत आहे. दरम्यान पंकजा मुंडे या गोपीनाथ गड येथील दसरा मेळावा संपन्न करुन पुण्यात जात असतांना माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी थांबल्या होत्या.

यावेळी दिलीप गांधी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी पंकजा मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना माजी खासदार दिलीप गांधी म्हणाले कि, सर्वसामान्यांचे नेतृत्वाचा स्व.गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे या चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत.

पक्षाने राष्ट्रीय महामंत्रीसारखे मोठ्या जबाबदारीचे पद देऊन त्यांची कार्याची दखल घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अधिक प्रभावी होईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment