मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी सोडू : आमदार संग्राम जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- गेल्या अनेक दिवसापासून अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे. अनेक वेळा प्रशासनाशी चर्चा करूनही अद्यापर्यंत कर्मचाऱ्यांचा एकही प्रशन मार्गी लागला नाही. सध्या जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे.

नगर शहरातही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कोरोनाच्या संख्येतही वाढ होत होती. हा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून संसर्ग कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या.

गेल्या आठ महिन्यापासून रात्रंदिवस काम करीत आहे. या महामारीमुळे आपल्या महापालिकेचे तीन कर्मचारी दगावले आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाकाळात कर्मचारी मयत झाल्यास शासनाकडून ५0 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. परंतु अध्यापपर्यंत आपल्या मयत सहकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नाही.

तरी आपण स्वत: आपण जातीने लक्ष घालून कुटुंबीयांना मदत मिळवून द्यावी व त्याच्या वारसांना तातडीने नोकरी मिळावी अशी मागणी अहमदनगर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केले आहे.

यावेळी विविध मागण्यांची माहिती देतांना कर्मचारी म्हणाले की राज्यात अनेक ड वर्ग महानगरपालिकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. आपल्या महानगरपालिकेत अद्यापपर्यंत सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही. सहाव्या वेतन आयोगाचा फरक हा एकरकमी रक्कम दिवाळीपर्यंत मिळावा.

दोन तीन वैद्यकिय प्रतिपृर्तीचे बीले प्रलंबित आहे. तेही तातडीने अदा करण्यात यावे. आश्वासित प्रगती योजनेचा प्रलंबित असलेला थकबाकीचा फरक मिळावा. एल.एस.जी.डी व एल.जी.एस. उरत्तीण कर्मचाऱ्यांना नेमानुसार वेतन वाढ मिळावी. पदोन्नती मिळालेल्या सर्वकर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे कायम आदेश मिळावे.

मात्र कर्मचाऱ्यांना नेमानुसार पदोन्नती मिळावी. सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी सानुग्रह मिळावी. पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी शासन निर्णयानुसार अग्रीम मिळावी. परिविक्षाधीन कालावधी संपलेल्या कर्मचाऱ्यांना कायम आदेश देण्यात यावे.

अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करतांना विजय बोधे, बाळासाहेब विधाते, दिनेश सुळ, राहुल साबळे, विजय बालानी, गणेश येणे, नंदकुमार नेमाने, बाळासाहेब अदमाने, राहल शिंदे, अंकुर नवगिरे, आशा साबळे, आजीम शेख, सुबोध देशमुख, रेणुका काशिद,

अंबादास वाघ, सुरेश आष्टेकर, विठठल उमाप, आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की लवकरच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक लावून प्रशन सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment