धक्कादायक ! मामाकडे गेलेल्या भावंडांचा शिळी बिर्याणी खाल्ल्याने मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- राहाता तालुक्यात एका धक्कादायक घटनेत दोन सख्या बहिण भावंडांचा मृत्यू झाला आहे. त्या दोघांनी मामाकडे शिळी बिर्याणी खाल्ल्याने त्यातून विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.अरहान (वय 5 वर्षे ) व आयेशा (वय 4 वर्षे) अशी या चिमुरड्यांची नावे आहेत.

या दुर्दैवी मृत्यूची वार्ता मामा शाविद यांना समजल्याने त्यांना मानसिक धक्का बसल्याने रुग्णालयातच पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आजी शबाना ही रुग्णालयात उपचार घेत आहे.

अधिक माहिती अशी :- वसिम रज्जाक शेख हे आपल्या कुटुंबीयासमवेत राहतात. वसिम यांचा मुलगा अरहान व मुलगी आयेशा हे दोन मुले त्यांना असून वसिम यांची पाथरे नजीक हणुमंतगांव (कोंबडवाडी) येथे सासुरवाडी आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासुन अरहान व आयेशा मामा शाविद यांच्या घरी गेले असता दरम्यानच्या काळात मामा शाविद व सदर भाचा भाचीसह शाविदचे कुटुंबीय यांना दोन दिवसांपासून शारिरीक अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांनी सोनगांव सात्रळ येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेण्यास सुरुवात केली.

रविवारी सकाळी 9 च्या दरम्यान अरहान व आयेशा,मामा शाविद व आजी शबाना यांची प्रकृती खालावत चालल्याने नातेवाईकानी त्यांना लोणी

येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मुलगा अरहान यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले.त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने मुलगी आयेशा हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment