बापरे ! अतिवृष्टीमुळे विहीर खचली, कांदाही गडप; घराबाबतही झालेय ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली.

याचा परिणाम अहमदनगर जिह्यावरही मोठ्या प्रमाणात झाला. या पावसाने जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 2 लाख 30 हजार शेतकर्‍यांचे 156 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील एका शेतकर्‍याची या पावसाने चांगलीच दैना उडवली आहे. कचरू खंडेराव कर्जुले असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

विहिर अतिवृष्टीमुळे खचली असून या विहिरीनजीकची या शेतकर्‍याचा कांदा चाळीतील कांदाही या विहिरीत गेल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे.

शेजारील शौचालय व बाथरुमही विहिरीत पडले. त्याचबरोबर राहते घरही ढासाळण्याच्या मार्गावर आहे. ऐन सणासुदीत या शेतकर्‍यावर मोठी आपत्ती कोसळली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment