..म्हणूनच मला विधानसभेत पाठवले नाही : वहाडणे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. पराभव झाला, तरी मी राजकारण न करता विकासकामे करत आहे.

लोकप्रिय ताईंच्या अतिलोकप्रिय पुत्राने आधी सांगावे, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला असलेले तीस हजारांचे मताधिक्य कुठे गेले? शेकडो कोटींचा निधी आणल्याचे सांगता, पण कुणाला किती कोटी कमिशन मिळाले हे का सांगत नाही?

आधी १० वर्षांत झाली नाहीत इतकी कामे मी साडेतीन वर्षांत केली, असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विवेक कोल्हे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सांगितले.पत्रकात म्हटले आहे,

मी नगराध्यक्ष झाल्यानंतर नगरपरिषदेला निधी मिळू दिला नाही, कारभारात अडथळे आणले. पाच नंबर साठवण तलाव व्हावा, म्हणून मी प्रयत्न करत होतो, पण तुम्ही अडथळे आणले, म्हणून जनतेने तुम्हाला घरी बसवले. गावचे हक्काचे क्रीडा संकुल पळवणारेच विचारतात क्रीडांगणासाठीची राखीव जागा घ्यायचा प्रयत्न का केला नाही?

नगरपरिषदेची आर्थिक कुवत नसताना आरक्षित जागा घ्यायच्या ठरवले, तर किती कोटी लागतील याचे भान आहे का? एकीकडे निधी मिळू द्यायचा नाही, पण दुसरीकडे माझ्याविरुद्ध बातम्या पेरायच्या हे उद्योग बंद करा. नवीन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करणाऱ्या संस्थेला तुम्हीच हाकलून लावले.

निसर्ग कॅन्सल्टन्सीने वसुलीसाठी दावा ठोकला आहे. निकाल विरोधात गेला, तर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? कुणी किती पैसे ठेकेदाराकडून उकळले याचा शोध घ्या. मेनलाईनवर नळजोड घेणारे पाणीचोर तुमच्याच भोवती आहेत.

नेत्यांत धमक असेल, तर त्यांनी त्यांच्याच चेल्यांना नळजोड स्वतःहून तोडण्याचे आदेश द्यावेत. नगरपरिषदेने तसे करायचे ठरवल्यास शहरातील अनेक रस्त्यांची तोडफोड करावी लागेल, असे वहाडणे म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment