निवडणुकीच्या वादातून सरपंचाच्या पतीस जाळले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात निवडणुकीच्या वादातून काही गुंडांनी महिला सरपंचाच्या पतीस जिवंत जाळून त्याची हत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली.

महिला सरपंच छोटका देवीने ही हत्या निवडणुकीच्या वादातून झाल्याचे सांगितले. सरपंच पती अर्जुन (५०) जळत असताना कोरी गावाबाहेर दिसले. गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची तत्काळ माहिती दिली.

त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.अर्जुन यांचा मुलगा सुरेंद्रकुमार याने सांगितले, रात्री उशिरापर्यंत वडील बाजारातून घरी परतले नव्हते.

नंतर मी त्यांना अागीच्या ज्वाळांत लपटलेले पाहिले. त्यांनी चौघा व्यक्तींची नावे सांगितली. पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अमेठीच्या खासदार व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment