बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी संघटना आग्रही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- जय भगवान महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी शिरापूर (ता. पाथर्डी) गावात बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या सार्थक बुधवंत या चिमुकल्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

तर शासनाकडून कुटुंबीयांना भरीव निधी मिळण्यासाठी व बुधवंत कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे, दक्षिण जिल्हाध्यक्ष रमेश सानप, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब वाघ, मदन पालवे, नगर शहराध्यक्ष अमोल डापसे, सागर बोडके,

पाथर्डी शहराध्यक्ष महेश दौंड अवीनाश वाघ, भगवान बुधवंत आदी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडी व करडवाडी या भागातील तीन बालकांचा नरभक्षक बिबट्याने बळी घेतला असून, ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या दु:खात जय भगवान महासंघ सहभागी असून, वन विभागाच्या निष्क्रीयतेने तीन बालकांचा बळी गेला आहे.

याप्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचारी यांचे निलंबन करण्याचे मागणी मुख्यमंत्री व वन मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या कुटुंबीयांच्या पाठिशी जय भगवान महासंघ उभा राहणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे म्हणाले.

जय भगवान महासंघाच्या शिष्टमंडळाने वन विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली असता बुधवंत कुटुंबीयांना तात्काळ घरासाठी तार कम्पाऊंड, लाईट व्यवस्था व शौचालय उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन देण्यात आले.

तर तीन दिवसात 15 लाखाची मदत देणार असल्याचे सांगितल्याने महासंघाच्या वतीने तीसगाव-पाथर्डी रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment