‘त्या’ शेतकऱ्याना नुकसानीपोटी २.२० कोटी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-खरीप हंगामातील हवामान अधारित पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख ८३ हजार ९३४ रूपयांचा पिक विमा मंजुर झाल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांना दिली.

शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाल्यानंतर त्यांनी उतरविलेल्या पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी आमदार नीलेश लंके यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. प्रत्येक आठवडयास मंत्रालयात मंत्री भुसे यांची भेट घेउन आ. लंके यांनी पिकविम्याची रक्कम दिवाळीपूर्वी मिळावी

यासाठी भुसे यांच्या माध्यमातून सबंधित कंपनीकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून पारनेर तालुक्यासाठी २ कोटी २२ लाख ८३ हजार ९३४ रूपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

तालुक्यातील ६३१ शेतकऱ्यांना संत्रा पिकासाठी १ लाख ९९ हजार ४५, डाळींबासाठी २ कोटी २० लाख ३ हजार ९४० तर आंबा पिकासाठी ८० हजार ९४९ रूपयांचा विमा मंजुर झाला आहे.

दिवळीपूर्वी शेतक-यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचा प्रयत्न असून त्यामाध्यमातून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न असल्याचे लंके यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांसह मतदारसंघातील सर्वच घटकांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे.

नागरीकांनी कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता काही शंका असल्यास आपल्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन आ. लंके यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment