रस्त्यांवरच पार्क केली जातायत वाहने; समस्येकडे पोलिसांचा कानाडोळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- शासनाने घालून दिलेले नियमांची पायमल्ली करण्याचे जणू व्रतच नागरिकांनी घेतले असल्याचे नेहमी दिसून येते. नो पार्किंग म्हंटले कि तिथेच वाहने उभी करणार, तसेच वाहतुकीच्या नियम पायदळी तुडवणार यामुळे वाहतूक कोंडी होऊन परिणामी अनेकदा अपघाताला देखील सामोरे जावे लागते असते.

दरम्यान असाच काहीसा प्रकार अकोले तालुक्यातील रस्त्यांवर घडताना दिसत आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथील कोल्हार घोटी रस्त्यावर चक्क पार्किंग झोन असल्यागत जीप, ट्रक, मोटरसायकल, ट्रक्टर बिनधास्तपने लावून गप्पाचा फड रंगला जात आहे. मोठा रस्ता होऊनही वाहतुकीला अडचण निर्माण होऊन अपघात ही वाढले आहेत.

बारी ते संगमनेर हा २२५ कोटीचा रस्ता सुरू असून या रस्त्यावर वाहन तल करून वाहतुकीला अडचण निर्माण करण्याचे काम खाजगी वाहतूकदार करत असल्याचे चित्र समोर आले आहे. पोलिस खाते व सार्वजनिक बांधकाम खाते रस्त्याच्या अडवणूक व वाहनतळ रोखण्यास असमर्थ दिसत आहे. त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.

त्यात रस्त्याच्या कडेला असलेले दुकानदार हळू हळू रस्त्यावर येऊ लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी पाहायला मिळत आहे. या वर्दळीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोटर सायकल व चारचाकी वाहने रस्त्यावर उभे करून जणू पार्किंग समजून बिनधास्त पने लोक गाड्या उभा करत असल्याने वाहतूक कोलमडली आहे.

असाच प्रकार सुरु राहिल्यास या रस्त्यांवर अपघाताचे सत्र सुरु होण्यास वेळ लागणार नाही, नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करत पोलीस प्रशासनाने खंबीर व दंडात्मक पाऊले उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिक करू लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment