या बेशरम आणि खोटारड्या सरकारला हजारो वोल्टचा शॉक देण्याची गरज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात कुठलीही सवलत मिळणार नाही आणि वीजबिल भरले नसल्यास तात्काळ कनेक्शन खंडित करण्याचे आदेश दिले आहेत हा केवळ बेशरमपणा नसून खोटारडेपणाचा कळस आहे.

एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर या सरकारला जाग आली. आता या बेशरम आणि खोटारड्या सरकारला हजारो वोल्टचा शॉक देण्याची गरज आहे.

भाजपने आंदोलन केल्यानंतर वीजबिलात सवलत देण्याचं नाटक या सरकारने केलं पण अखेर यांचा खरा चेहरा जनते समोर आला आहे.

सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल आणि या सरकारकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडेल. अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

Leave a Comment