कृषिपंपाची वाढीव वीजबिले माफ करण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढीव वीजबिले चांगलीच गाजू लागली आहे. वीजबिल माफ करण्यात यावी या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

कोरोना लाॅकडाऊनमधील कृषिपंपांची वाढीव वीजबिले माफ करण्याची मागणी अकोले येथील युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेने केली आहे.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी. के. बागूल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील गावागावांतून वीजबिल सुधारणा कॅम्प आयोजित करून शेतकऱ्यांची अन्यायकारक वीजबिले कमी करून द्यावीत.

अनेक दिवसांपासून रखडलेल्या कृषिपंपांच्या जोडण्या तातडीने द्याव्यात व शेतीसाठी पूर्ण दाबाने दिवसा वीजपुरवठा करावा. अनेक दिवसांपासून नादुरुस्त, जळालेले ट्रान्सफॉर्मर लवकर उपलब्ध करून द्यावेत,

धोकादायक ट्रान्सफार्मर आणि लाइन्स तातडीने दुरुस्त करून संभाव्य अपघात टाळावेत या आणि इतर मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश नवले यांच्यासह अकोले तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

यातील महत्त्वपूर्ण विषय तातडीने मार्गी लागतील व बाकी विषयांबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता बागूल यांनी दिले. शाखा अभियंता पिंपळे, सुरेश नवले आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment