गेली सात वर्षे महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- लोकप्रतिनिधीमुळे राष्ट्रीय महामार्ग 160 या शिर्डी नगर रस्त्यासाठी चारशे तीस कोटी मंजूर झाले. पण या रस्त्याला आजपर्यंत ढबू देखील मिळाला नाही.

याचा अर्थ येथील आजी माजी आमदारांसह खासदारही झोपलेले आहेत का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग साहनी यांनी केला आहे.

गुजरात मध्यप्रदेश यांना जोडणार्‍या महामार्गावरून सुट्टीच्या कालावधीत शिर्डीसाठी येणार्‍या भक्तांची संख्या जास्त असते. त्यामुळे महामार्गावरील जड वाहने, रिक्षा प्रवासी वाहतूक, ऊस वाहतूक यासह लहान वाहनांची संख्याही वाढते.

रस्ता रुंदीकरणाची कामे जिथे झाली आहेत तिथेही रस्त्यांची अवस्था बिकट आहे. दुर्दैवाने स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी याबाबत उदासीन आहेत.

थातूरमातूर कामे केली जातात. थोड्याशा पावसात पुन्हा खड्डे तयार होतात. गेली सात वर्षे महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम आहे. यंत्रणा सुस्त आणि ठेकेदार मस्त अशी परीस्थिती कायम आहे.

खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. दरवर्षी महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत येतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मार्गावरील खड्ड्यांची चर्चा होते.

संबंधित यंत्रणांना रस्तेदुरुस्तीची डेडलाईन दिली जाते. प्रत्यक्षात कुठलीही कारवाई होत नाही. शिर्डी ते कोपरगाव या रस्त्यासाठी आमदार, खासदार यांच्याकडून निधी मंजूर करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याच्या कोणत्याही हालचाली व प्रयत्न दिसत नाही.

असा आरोपही सहानी यांनी केला असून याबाबत येथील जनतेमध्ये मोठा रोष आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आता कोपरगाव शिर्डी या रस्त्यासाठी शासन दरबारी जनतेनेच लढा उभारावा असे आवाहन सहानी यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment