चोरट्यांच्या भीतीनं नागरिकांची झोप उडाली; पोलीस प्रशासन मात्र निर्धास्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे.

नवीन पोलीस अधीक्षक येऊनही नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अक्षरश कोलमडली आहे. यामुळे नागरिकांची झोप देखील उडाली आहे.

नुकतीच नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे बुधवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

जेऊर येथील महावितरण कंपनीच्या शेजारी चाफेवाडी येथे राहत असलेले मधुकर म्हस्के (वय- 55) यांचे घर फोडून 67 हजार रूपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा एक लाख 16 हजार 500 रूपयांचा ऐवज लंपास केला.

म्हस्के यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच इमामपूर येथील भाऊसाहेब आबाजी टिमकरे यांचे घर फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिणे चोरीला गेले. कोकणवाडी येथील भरवस्तीत लता ससे यांचे घर व किराणा दुकान फोडून चोरी करण्यात आली आहे.

एकाच वेळी तिन्ही ठिकाणी चोरीचा प्रकार घडल्याने चोरांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. घटनास्थळी नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment