कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्या तिघांनी प्राण गमावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-बेशिस्त वाहन चालवणे, नियमांचे उल्लंघन करणे… आदी घटनांमुळे अनेकदा गंभीर अपघात  घडत असतात. यामध्ये अनेकदा अनेकांना जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

यातच असाच  एका अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची रिक्षाला धडक बसली या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

सुमन रमेश गरुड (वय वर्ष 65 रा.गणेश नगर, कल्याण रोड नगर), रविंद्र देवीदास सोळंकी (वय 35 ) व रोहित देवीदास सोळंकी (वय 33 रा. सिद्धार्थनगर लाल टाकी) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर पुणे रोड वरील शिवराज हॉटेल कन्यारत्न समोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातातनंतर चालक पसार झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment