नगरपरिषदेकडून त्या पाणी जर प्रकल्पांवर कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-राष्ट्रीय हरित लवाद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अवैध शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली असलेले पाण्याचे प्रकल्प बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने कोपरगाव शहरात अवैधपणे सुरू असलेल्या पाणी जार केंद्रांना नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी अचानक धाड टाकून ते सीलबंद करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान नगरपरिषदेच्या या धडक कारवाईमुळे अवैध पाणी शुद्धीकेंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान यापुढेही ही कारवाई सुरूच राहील, असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत किंवा परवानगी असल्याशिवाय असे प्रकल्प सुरू ठेवण्यास नियमानुसार बंदी आणली गेली असून असे प्रकल्प असल्यास त्यांना त्वरित सील करण्यास सांगण्यात आले आहे.

ही कारवाई तीन दिवसांत करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्याने कोपरगाव नगरपरिषदेने पाच केंद्र चालकांवर ही कारवाई केली आहे. ही कारवाई कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment