ठाकरे सरकारच्या त्या निर्णयाचं आमदार काळेंकडून स्वागत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत 2019 पर्यंतच्या राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

राज्यातील ठाकरे सरकारच्या या दिलासादायक निर्णयाचे कोपरगाव मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले कि, मागील सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागली होती.

त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते या आंदोलनावेळी कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्याला आपल्या जीवाचे बलिदान द्यावे लागते होते.

या आंदोलनादरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल करण्यात आली होती. आंदोलन करणाऱ्या व आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी व नागरिकवर गुन्हे दाखल करण्यात आली होती.

ते मागे घेण्याचा पाठवला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून यश मिळाले आहे, त्यामुळे हा निर्णय स्वागत करतो असे काळे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment