औरंगाबाद पाठोपाठ आता नगरचे नाव बदला; खासदारांनी केली मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- युपीमधील शहरांची नाव बदलांची पद्धत आता महाराष्ट्र राज्यातही जोर धरू लागली आहे. नुकतेच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा याची मागणी जोर धरू लागली आहे.

हि मागणी चर्चेत असताना आता कोणताही वेलांटी, मात्रा व काना नसलेले अहमनगर याचे नाव बदलण्याची मागणी आता होऊ लागली आहे. औरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचेही नामांतर व्हावे.

अहमदनगरचे नाव आंबिकानगर करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

यावेळी बोलताना खासदार लोखंडे म्हणले कि,औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, ही जनतेची मागणी आहे. ते अपेक्षितच आहे. याबाबत आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतली.

परंतु औरंगाबादबरोबरच अहमदनगरचेही नामकरण करून “आंबिकानगर’ असे व्हावे, अशी आमची मागणी आहे. शहराच्या नामकरणावरून सध्या राजकीय वाद सुरू आहे यातच नामकरणाबाबत कॉंग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले.

विरोधकांनी शहराची नावे बदलण्याची मागणी करण्यापेक्षा विकासाकडे पहावे, असे ते म्हणाले होते. तोच धागा पकडून शिवसेनेचे खासदार लोखंडे यांनी नगरबाबतही वक्तव्य करून नवीन वादाची ठिणगी टाकली आहे.

Leave a Comment