समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची लातूर जिल्ह्यातील साकोळ येथे विटंबना झाल्याचा लहुजी शक्ती सेना व मातंग समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.

तर या प्रकरणातील समाजकंटक आरोपींना अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट यांनी दिले.

महापुरुष हे देशाचे धरोवर असून, त्यांचा मान सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महापुरुषांचे पुतळे समाजाला सतत प्रेरणा देत असतात.

अशा पध्दतीने एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करणे हे समाजामध्ये द्वेष पसरवण्यासारखे आहे. हे देशद्रोही कृत्य आहे. या घटनेने समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

याची शासनाने तात्काळ दखल घेऊन पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

Leave a Comment