जिल्ह्यात ४५ हजार ३३४ मतदारांची नव्याने नोंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. दरम्यान प्रशासनातर्फे २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो.

या अनुषंगाने १७ नोव्हेंबरपासून विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. १ जानेवारी २०२१ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, अशांचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

१ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची मतदारसंख्या आता ३५ लाख ४ हजार ७७ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात नव्याने ४५ हजार ३३४ मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये या नव्या तरुण मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

Leave a Comment