…’त्या’ पोलिसांच्या वारसांना मिळणार सरकारी नौकरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- करोना काळात कर्तव्य बजावत असताना जिल्हा पोलीस दलातील सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना पोलीस दलात नोकरी देण्यासाठीची प्रक्रिया आठवडाभरामध्ये केली जाईल.

जिल्हा पोलीस दलात अनुकंपा तत्वावर 27 पदे भरली जाणार आहेत. जिल्हा पोलीस दलातील मयत झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वारसांना पोलीस दलात संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सुमारे तीन हजार पोलीस करोना काळात अहोरात्र मेहनत घेत होते. सुरूवातीच्या काळात जिल्ह्यातील पोलिसांना करोनाचे संक्रमण झाले नव्हते.

परंतु, जिल्ह्यात करोना रूग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलीस दलातही करोनाने शिरकाव केला होता. यावेळी जिल्हा पोलीस दलातील सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या पोलिसांच्या वारसांना पोलीस दलात स्थान मिळणार आहे.

Leave a Comment