फक्त 7 रुपयांच्या गुंतवणूकीवर महिन्याला 5 हजार पेन्शन मिळवा, कसे ? जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- आपण पेन्शनर असल्यास आपल्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. सेवानिवृत्तीनंतर आपल्याकडे उत्पन्नाचे कोणतेही नियमित साधन नसते, म्हणून सेवानिवृत्तीनंतरच्या गरजा भागविण्यासाठी पेन्शन आवश्यक असते.

अशा परिस्थितीत आम्ही आपल्याला शासनाने पुरवलेल्या सुविधांविषयी सांगणार आहोत. जे आपल्याला आजीवन पेन्शन घेण्याची संधी देईल. अटल पेन्शन सरकारी पेन्शन योजनेंतर्गत मोदी सरकार आपल्या वृद्धावस्थेसाठी सहयोग देत आहे.

अटल निवृत्तीवेतन योजना वृद्धापकाळामधील आधार आहे :- प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भविष्याबद्दल काळजी वाटते, ज्यासाठी आजच्या काळात प्रत्येकजण काही ना काही गुंतवणूकीचा पर्याय शोधतो. अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे.

या योजनेंतर्गत केंद्र सरकार असंघटित क्षेत्रात काम कारबऱ्या लोकांना दरमहा एक हजार ते पाच हजार रुपये पेन्शन देते. 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणीही अटल पेन्शन योजना खाते उघडू शकते. या सरकारी योजनेची सर्वात महत्वाची बाब म्हणजे या योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक केली जाईल तितका अधिक निधी जमा होईल.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणे आवश्यक आहे. या योजनेत 60 वर्षानंतर ठेवीदारांना पेन्शन मिळू लागते. अटल योजनेतील पेन्शनची रक्कम आपण केलेल्या गुंतवणूकीवर आणि आपल्या वयावर अवलंबून असते.

सरकारी स्‍कीमचे अनेक फायदे:-  चांगली गोष्ट म्हणजे अटल पेंशन योजना ही केवळ जिवंतपणीच पैसे नाही पुरवत तर मृत्यू नंतरही कुटुंबाची मदत करते. जितक्या लवकर आपण अटल पेन्शन योजनेत सामील व्हाल तितका अधिक फायदा तुम्हाला मिळेल.

वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत एखादी व्यक्ती सामील झाली तर वयाच्या 60 व्या नंतर त्याला 5000 रुपये मासिक पेन्शन घेण्यासाठी 210 रुपये दरमहा जमा करावे लागतील. म्हणजेच या योजनेत दररोज 7 रुपये जमा केल्यास तुम्हाला महिन्याला 5000 रुपये पेन्शन मिळू शकते.

या योजनेंतर्गत दरमहा1000 रुपये मासिक पेन्शनसाठी फक्त 42 रुपये महिन्याला जमा करावे लागतात. त्याचबरोबर, 2000 रुपये पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी 168 रुपये जमा करावे लागतील.

 मृत्यू नंतरही लाभ मिळेल :- जर या योजनेशी संबंधित एखाद्या व्यक्तीचा 60 वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर त्याची पत्नी या योजनेत पैसे जमा करणे चालू ठेवू शकते आणि 60 वर्षांनंतर दरमहा पेन्शन मिळवू शकते. दुसरा पर्याय असा आहे की त्या व्यक्तीची पत्नी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर एकरकमी हक्क सांगू शकते. जर पत्नीचेही निधन झाले तर तिच्या नॉमिनी व्यक्तीला एकरकमी रक्कम दिली जाईल.

 2.4 कोटींपेक्षा जास्त ग्राहकांची संख्या :- अटल पेन्शन योजनेतील सदस्यांची संख्या 2.4 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान 260 एपीवाय सेवा प्रदात्यांमार्फत 17 लाखाहून अधिक एपीवाय खाती उघडली गेली आहेत. अशाप्रकारे 20 ऑगस्ट 2020 पर्यंत अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांची संख्या 2.4 कोटींपेक्षा अधिक झाली आहे.