This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- स्वच्छ भारत अभियाना निमित्त नगर शहर हे फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी सज्ज झाले असून मनपाच्या वतीने विविध ठिकाणी भिंती रंगवून स्वच्छतेचे संदेश देण्याचे काम केले आहे.
या माध्यमातून नागरिकांनामध्ये जनजागृती होण्यास मदत होईल. मनपाचे घनकचरा विभागातील कर्मचारी ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबवित आहे.
Advertisement
याचबरोबर नगरकरही या स्वच्छता मोहिमेमध्ये मोठया संख्येने उतरले असून रांगोळी काढून स्वच्छतेचे महत्व पटवून सांगत आहे.
सर्व नगरकरांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घेवून सहकार्य करावे असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.
Advertisement
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|