लव्ह मॅरेजनंतरही होतात भांडणे, ‘हे’ उपाय केल्याने आयुष्य आनंदाने भरून जाईल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- असे म्हणतात की प्रेम करणे सोपे आहे, परंतु प्रेम मिळवणे आणि ते निभवणे अधिक कठीण आहे.

या सर्व अडचणींवर मात केल्यानंतर, लोक प्रेम विवाह करतात परंतु तरीही ते आनंदी राहत नाहीत. 24 तास एकत्र राहिल्यानंतर, ते एकमेकांना इतके खटकायला लागतात की त्या दोघांमध्ये क्षणो क्षणी भांडणे सुरू होतात.

आज आपण असे काही उपाय जाणून घेऊयात ज्यामुळे प्रेम विवाहात येणाऱ्या समस्या दूर होतील आणि प्रेमाचे हे नाते आनंदाने भरेलेले असेल.

 या उपायांसह प्रेम विवाहातील समस्या दूर करा

– लव्ह मॅरेज केल्यावर पार्टनरसह अडचणी येत असतील तर जास्तीत जास्त गरीबांना गव्हाचे पीठ आणि मोहरीचे तेल दान करा. यामुळे परस्पर संबंध सुधारतील.

– भेटवस्तू म्हणून आपल्या जोडीदाराला कधीही काळा-निळ्या रंगाच्या गोष्टी किंवा तीक्ष्ण गोष्टी देऊ नका. यामुळे चांगले संबंधही बिघडतात.

– जर हे प्रकरण नाते तुटेपर्यंत पोचले असेल तर चाळीस दिवस एक उपाय केल्याने फायदा होईल. यासाठी दररोज एका लिंबाचे 4 तुकडे करा आणि ते 4 दिशेने फेकून द्या. हे करताना कोणीही आपल्याला पाहणार नाही याची काळजी घ्या.

– दररोज मीठ मिश्रित पाण्याने घर पुसून टाका. याशिवाय घरात रोज कापूर जाळण्याने नकारात्मक उर्जा दूर होईल.

– दर शुक्रवारी राधा-कृष्णाच्या मंदिरात जा. तेथे पिवळ्या रंगाची फुले आणि साखर अर्पण करा, यामुळे प्रेम विवाहातील अडचणी दूर होतील.

(टीपः या लेखात दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही त्यास पुष्टी देत नाही.)