Ahmednagar News : श्रीगोंद्यातून द्राक्ष व्यापाऱ्याचे अपहरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : नाशिक येथील द्राक्ष व्यापाऱ्याचे श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील शेंडगेवाडी परिसरात चार इसमांनी गाडीला कट मारल्याचे कारण सांगत मारहाण करत रात्री सात ते पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अपहरण करून काष्टीकडे पसार झाल्याची घटना घडली असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सौरभ रमेश शेवाळे (रा. कळवण जि. नाशिक) असे अपहरण झालेल्या द्राक्ष व्यापाऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस उपनिरिक्षक समीर अभंग यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

या बाबत मिळालेल्या माहिती नुसार कळवण (जि. नाशिक) येथील द्राक्ष व्यापारी सौरभ रमेश शेवाळे हे श्रीगोंदा शहराजवळील हॉटेल अनंन्या येथे मुक्कामी असल्याने संध्याकाळी श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील द्राक्ष एजंट सागर नवले हे त्यांना सोडण्यासाठी काष्टी रस्त्याने जात असताना,

शेंडगेवाडी परिसरातील कानन पेट्रोल पंपाजवळ चारचाकी गाडीत पाठीमागून आलेल्या चार अनोळखी इसमांनी शेवाळे यांच्या चारचाकी गाडीला गाडी आडवी लावून गाडीला कट मारल्याचे कारण करत गाडीतील सौरभ शेवाळे तसेच द्राक्ष एजंट सागर नवले या दोघांना मारहाण करू लागले. यावेळी घाबरलेल्या नवले तेथून पळून गेल्याने मारहाण करत असलेल्या चार अनोळखी इसमांनी शेवाळे यांना त्यांच्याच गाडीत टाकून त्यांचे अपहरण करत त्यांना काष्टीच्या दिशेने पसार झाले.

घाबरलेल्या सागर नवले यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधत घटनेबाबत माहिती दिली. घटनेची माहिती समजताच पोलिस उपनिरिक्षक समीर अभंग यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला मात्र ते मिळून आले नाही.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.