अहमदनगर : शेतकरी पुत्राने एमपीएससीत मारली बाजी ! बनला फौजदार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Psi Success Story : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचा स्वप्न डोळ्यात घेऊन एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असतात. या परीक्षेत लाखो विद्यार्थी बसतात त्यापैकी काही शेकडो विद्यार्थी अधिकारी म्हणून नियुक्त होत असतात.

त्यामुळे ही परीक्षा अधिकच कॉम्पिटिटिव्ह आणि खडतर बनली आहे. मात्र असे असले तरी या परीक्षेत दरवर्षी लाखो विद्यार्थी आपले नशीब आजमावत असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या एमपीएससी परीक्षमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या अनेक तरुणांनी अधिकारी बनण्याचे आपलं स्वप्न सत्यात उतरवल आहे.

यामध्ये पाथर्डी तालुक्याच्या मौजे मालेवाडी येथील रामहरी अण्णासाहेब खेडकर त्यांनी देखील फौजदार बनवून आपल्या गावाचं नाव रोशन केलं आहे. रामहरी यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत पीएसआय पदाला गवसणी घातले आहे. यामुळे सध्या रामहरी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

शेतकरी कुटुंबातून येणारे रामहरी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फौजदार बनण्याचं आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवल आहे. रामहरी यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. अगदी कोवळ्या वयापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या रामहरी यांनी सलग सहा वर्ष पोलीस प्रशासनात हवालदार म्हणून सेवा बजावली आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात त्यांनी हवालदार म्हणून काम पाहिले आहे.

पोलीस प्रशासनात काम करतानाच त्यांनी एमपीएससी परीक्षेसाठी देखील तयारी सुरू केली. या आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान त्यांनी अनेक चढ-उतार पाहिलेत. मात्र शेवटी त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात खरं उतरल आहे. हवालदार म्हणून सेवा बजावत असताना रामहरी यांनी अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला आणि एमपीएससीची पीएसआय पदाची परीक्षा पास करत शेवटी पीएसआय पदाला गवसणी घातली.

राम हरी यांनी शेतकरी आईवडिलांच्या डोळ्याचं आज खऱ्या अर्थाने पारणे फेडलं आहे. निश्चितच शेतकरी पुत्र आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. रामहरी यांनी देखील सर्वप्रथम हवालदार बनून आणि त्यानंतर फौजदार बनून ही बाब अधोरेखित केली आहे.