महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली निळवंडे डाव्या कालव्याची पाहणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गती दिली असून डाव्या कालव्याच्या 64 ते 70 किलोमीटर लांबीची पाहणी आज महसूलमंत्री श्री. थोरात यांनी केली.

कौठे कमळेश्वर, काथरवाडी, लोहारे मेंढवण या परिसरात विविध ठिकाणची पाहणी करत त्यांनी कामाचा आढावा घेतला. आमदार डॉ सुधीर तांबे, जि.प. सदस्य महेंद्र गोडगे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक,

कार्यकारी अभियंता गिरीश संघांनी, विवेक लव्हाट, उप कार्यकारी अभियंता प्रमोद माने, प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगळरूळे, तहसीलदार अमोल निकम, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री नामदार थोरात यांनी कवठे कमळेश्वर, मेंढवण, काथरवाडी,

लोहारे, कासारे या गावांमधील विविध ठिकाणच्या कालव्याची पाहणी करत अंतिम स्वरूपाच्या कामासाठी सूचना केल्या. याप्रसंगी मंत्री श्री. थोरात म्हणाले की, निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे.

2022 मधील पावसाळ्यात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे या भागाला देण्यासाठी पूर्ण प्रयत्न असून त्यादृष्टीने काम अत्यंत वेगात सुरू आहे. 2014 पर्यंत धरण पूर्ण करून कवठे कमळेश्वर, पिंपळगाव कोझिंरा, गणेश वाडी हे मोठे बोगदे मार्गी लावले.

गेल्या काही वर्षात धरणाचे काम थांबले होते. महाविकास आघाडी शासन सत्तेवर येतात 2019 मध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निळवंडेच्या कामाची बैठक घेऊन कामाला गती दिली. प्रकल्पावर जेथे दोन जेसीबी मशीन कार्यरत होते.

तेथे आज 35 मशीन कार्यरत आहे. कोरोना संकटातही रात्रंदिवस काम सुरू आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत कामाचा वेग कायम ठेवला आहे. अनेक ठिकाणी स्ट्रक्चरल कामेही पूर्ण झाली आहेत.

उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून या भागात या धरणाचे पाणी येईल तो आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असेल असेही ते म्हणाले. आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, निळवंडे धरण व कालव्यांची कामे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हातून पूर्ण होणे हे नियतीच्या मनात होते.

महाविकास आघाडी शासन सत्तेवर आले आणि या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. राज्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असतानासुद्धा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे दररोज या कामाचा आढावा घेऊन संबंधित विभागाला सूचना देत आहेत.

2022 मध्ये पाणी देण्याचे त्यांचे स्वप्न असून तोच त्यांच्या जीवनातील खरा आनंददायी क्षण ठरणार असल्याचे ते म्हणाले. महेंद्र गोडगे म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेच निळवंडेच्या कालव्यांद्वारे या दुष्काळी भागाला पाणी देणार आहे.