अहमदनगर बाजारभाव : भाजीपाल्याची आवक घटली ! असे आहेत दर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar market price : यंदा मान्सूनच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबतच भाजीपाल्याची देखील लागवड कमी प्रमाणात झाली होती. परिणामी उत्पादनाम मोठी तूट आली आहे. त्यातच परत आक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीचा फटका बसला.

त्यात देखील मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटात फळबागांना देखील चांगलाच फटका बसला असून अनेक ठिकाणी फळ गळती झाली तर अनेक भागात कमी प्रमाणात बहार आल्याने उत्पादनात घट आली आहे.

त्यामुळे उन्हाळ्याची चाहमल लागताच लिंबाला चांगले दर मिळत आहेत. मात्र दुसरीकडे कांद्याने मात्र पर शेतकऱ्यांची निराशाच केली आहे. निर्यात बंदी मागे घेतल्याच्या चर्चेमुळे रातोरात २५०० रूपयांवर गेलेला कांदा परत कोसळला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा लसणाचे उत्पादन कमी झाले असून अद्याप नवीन लसूण बाजारात येण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे बाजारात लसणाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने लसणाचे दर चांगलेच वाढलेले आहेत.

त्यापाठोपाठ गवारीच्या शेंगाला २०० रूपये किलोने विकल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या हातात मात्र अत्यंत कमी पैसे मिळत आहेत. त्यामुळे दर वाढून देखील शेतकरी उपाशीच असल्याचे चित्र आहे.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर टोमॅटो ४००- २०००, वांगी १००० ३०००, फ्लावर ५०० – २०००, कोबी ५०० २०००, काकडी ५०० २०००, गवार ८००० १४०००, घोसाळे २५०० ४५००, दोडका २५०० – ५०००,

कारले २००० ४५००, भेंडी १५०० ३५००, वाल १००० २५००, घेवडा १५००-२५००, तोंडुळे १५०० – २५००, डिंगरी २००० ३०००, बटाटे ५०० – १७००, लसूण ६००० २१,०००, हिरवी मिरची २५०० ४०००, आवळा १५०० – ३०००, शेवगा १५०० – ३५००,

लिंबू २००० – ९०००, आद्रक ४००० – ८०००, दु.भोपळा ५०० – १६००, शिमला मिरची १००० ४५००, मेथी ६०० १६००, कोथिंबीर ९०० – १०००, पालक ४००- १२००, शेपू भाजी ४००- १०००, रताळे १८०० – २०००, कांदा पात १००० – १०००, वाटाणा २००० ३५००.