रोहित पवार म्हणाले कर्जत-जामखेडला कोणत्याही वेगळ्या पॅटर्नची गरज नाही …कारण

अहमदनगर Live24 :- आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबीयांचा सर्वे करुन आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू आहे. नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे सर्वे होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. जामखेड शहरातील कोरोना बाधीतांची संख्या ही आता १७ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आपण देशाला नक्की वाचवू – डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24  :- कोरोनाच्या संकटावर मात करण्यात देशाने चांगले काम केले असून अशावेळी प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि निर्णयामुळे आपण देशाला नक्की वाचवू, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. येथील जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातुन काल तालुक्‍यातील मुंगी, चापडगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, आव्हाणे, अमरापुर येथील गरजूना जीवनावश्‍यक साहित्याचे … Read more

लॉकडाऊनच्या काळात आम्हाला हवी मदतीची साथ

अहमदनगर Live24 :- लॉकडाऊनमुळे यात्रा-जत्रांमधील मनोरंजनाचे विविध कार्यक्रम यंदा रद्द झाल्यामुळे लग्न सराईही पुर्णपणे बंद असल्याने लग्नसराईतील ऑक्रेस्ट्रा गाणी व करमणूकीच्या कार्यक्रमांवर बंदी आल्याने कलावंतांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांना आता मदतीचा राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनी ही पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे असल्याची भावना प्रवरासंगम येथील ऑक्रेस्ट्रा गायिका मुमताज शेख … Read more

नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेलला लागलेल्या आगीत सात लाखांचे नुकसान !

अहमदनगर Live24  :- शिर्डीत नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल वत्सलास भर दुपारी अचानक आग लागल्याने सात लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद असल्याने यात कोणी जखमी झाले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, १७ मार्चपासून साईमंदिर बंद झाल्याने लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व हॉटेल बंद आहेत. हॉटेल वत्सला … Read more

‘या’ 3 तालुक्यातच राहिले कोरोना रुग्ण, बाकी अहमदनगर जिल्हा करोनामुक्त !

अहमदनगर Live24 :- जिल्ह्यात आजवर 43 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 24 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात करोनाबाधित एकूण 17 रुग्ण असून हे सर्व बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यात जामखेड तालुक्यातील 11, संगमनेरमधील चार, तर नेवाशाती दोन रुग्णांचा समावेश आहे. जामखेड, संगमनेर, नेवासे वगळता जिल्हा करोना मुक्त … Read more

सुनेने दिला सासूच्या पार्थिवाला अग्निडाग !

संगमनेर :- येथील प्रसिद्ध वकील प्रदीप मालपाणी यांच्या मातोश्री व वकील ज्योती मालपाणी यांच्या सासू माजी मुख्याध्यापिका सरोजदेवी राजेंद्र मालपाणी (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवाला अग्नी डाग त्यांच्या स्नुषा ज्योती यांनी दिला. मालपाणी परिवाराच्या वतीने दशक्रियाविधी, अकरावा, बारावा आदी विधींना फाटा देत गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी मोठी रक्कम दिली आहे. या उपक्रमाचे अनेकांनी याचे … Read more

लॉकडाऊनमध्ये पोलीस उपनिरीक्षक मुलीचा अनोखा लाईव्ह विवाह सोहळा !

अहमदनगर Live24  :- लॉकडाऊन असल्याने कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता पुण्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे किरण वसंत निंभोरे आणि पोलीस उपनिरीक्षक राणी वाल्मिक डफळ या दोघांचा अनोखा लाईव्ह विवाह सोहळा नुकताच घोटवी गावी घरामध्ये पार पडला. सुमारे वर्षभरापूर्वी ठरलेल्या या विवाहासाठी अपेक्षित असणारा खर्च पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सुमारे दोन … Read more

खबरदार सोशल डिस्टन्स मोडाल तर ! पोलीस ठेवणार ड्रोनद्वारे नजर

श्रीरामपूर : सोशल डिस्टन्सच्या नियमाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्ती, संस्थांवर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या सबबी सांगून काही व्यक्ती, संस्था नियम मोडत आहेत. त्यांच्यावर लवकरच दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली. शिवाजी चौकात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. देशांमध्ये कोरोना बाधिताची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मामा भाच्याच्या वाद; मामाने पिले किटकनाशक तर भाच्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या !

अहमदनगर Live24 / श्रीरामपूर :- तालूक्यातील टाकळीभान येथे मामा भाच्याच्यात झालेल्या वादातून मामाने विषारी किटकनाशक पिल्याने घाबरलेल्या भाच्याने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या विषयी माहिती अशी की, टाकळीभान येथील नवनाथ वेणूनाथ खंडागळे (वय ३० वर्ष) व त्यांचा भाचा मनोज चव्हाण (वय २२ वर्ष) हे त्यांच्या शेतात वस्ती करून राहतात. … Read more

अहमदनगर शहरातील 23 मशिदीमध्ये एक वेळच्या आजानची परवानगी

अहमदनगर Live24 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉक डाउन काळात शहरातील सर्व मशिदी बंद आहेत. मात्र रमजान काळात राज्यांसाठी सवलत देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलाने शहरातील 23 मशिदी मध्ये उपवास सोडण्यासाठी फक्त (मगरिब) संध्याकाळची आजानला पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार एक वेळच्या आजानची परवानगी देण्यात आली आहे. … Read more

मुली घराबाहेर सुरक्षित नाहीत, असं म्हंटले जाते पण, मुली घरातही सुरक्षित राहिलेल्या नाहीत….

श्रीगोंदा : मुली घराबाहेर सुरक्षित नाहीत, असं म्हंटले जाते पण जन्मदात्या बापाकडूनच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार होत असतील, तर मुली घरातही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आपल्या पोटच्या १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या पित्यानेच अत्याचार केल्याची घटना दि.२५एप्रिल शनिवारी रात्री पीडित मुलीच्या घरी घडली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाविरोधात अत्याचार व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या … Read more

आ.रोहित पवार यांच्याकडून ३० हजार कुटूंबाना मदत

जामखेड : मतदारसंघाला नेहमीच आपलं कुटुंब समजुन,अडचणीच्या काळातही प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून दात्रुत्व स्विकारणारा आमदार रोहित पवार यांचा ‘मदतीचा हात’ कर्जत जामखेडच्या गरजू,गोरगरीबांना ‘आपला हक्काचा माणुस’ असल्याची जाणीव करून देत आहे. आ.रोहित पवार यांच्या याच दात्रुत्वातुन कर्जत-जामखेडसाठी पुन्हा एकदा भक्कम ‘मदतीचा हात’ पुढे आला आहे. कर्जत व जामखेड या दोन्हीही तालुक्यातील तब्बल ३० हजार … Read more

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

राहाता तालुक्यातील वाकडी येथील गणेशनगर रोड जाधव वस्ती येथील आदिनाथ भास्कर जाधव (वय ३८) या शेतकऱ्याचा विहिरीत तोल जाऊन मुत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे वाकडी परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, वाकडी – गणेशनगर रोडवर असलेल्या जाधव वस्ती भागात राहणारा अल्पभूधारक शेतमजूर आदिनाथ भास्कर जाधव हा शुक्रवारी (दि. २४) दुपारनंतर … Read more

साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊनने आर्थिक संकटात सापडलेल्या बोल्हेगाव, गांधीनगर येथील चोभे कॉलनीत शंभर गरजू कुटुंबीयांना साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने जीवनावश्यक अन्न-धान्य व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष दत्तात्रय पारखे, शंकर बोरुडे, सचिव सोमनाथ बोर्‍हाडे, श्रीपाद वाघमारे, अतुल मिसाळ, दिनेश शिंदे, राजू पंचमुख, मल्हारी वाव्हळ, उमेश क्षिरसागर, नितीन पोता, … Read more

हेल्प देम ग्रुपच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या युध्दात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत खर्‍या बातम्या देऊन जागृतीचे काम करणार्‍या माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार व वृत्त छायाचित्रकार यांचा भिंगार येथील हेल्प देम ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर या युध्दात माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रेरणा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. हेल्प देम ग्रुपचे युवक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन विविध … Read more

अन आमदार लंके यांनी थेट गाठले रेशन दुकानदाराला

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निंबळक येथून वारंवार पुरेसे धान्य मिळत नसल्याची तक्रार येत असल्याने आमदार निलेश लंके यांनी थेट निंबळक गावात रेशन दुकानदाराला गाठले. तर रेशन दुकान उघडून मोफतचे धान्य, केशरी कार्डसाठी आलेले धान्य व पुरवठा करण्यात आलेल्या धान्यासह शिल्लक असलेल्या धान्य साठ्याची माहिती घेतली. अत्यंत अभ्यासू व आक्रमकपणे आमदार लंके यांनी रेशन दुकानदारांना विविध … Read more

आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास पाचशे लिटर सॅनीटायझरचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशासह महाराष्ट्रात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्याच्या लढ्यात महत्त्वपुर्ण योगदान देणार्‍या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांसाठी आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीच्या वतीने पाचशे लिटर सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. तेलीखुंट पॉवर हाऊस जवळील जुने सिव्हिल हॉस्पिटल येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सॅनीटायझरचे बॅरल देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे … Read more

लॉकडाऊननंतर विवाहसोहळा -ना.तनपुरे

राहुरी शहर : डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सेवा भावी संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेला रविवार, २६ एप्रिल २०२० रोजी आयोजन करण्यात आले होते. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र देशात लॉकडाऊन असल्याने हा विवाह सोहळा लॉकडाऊन संपल्या नंतर घेतला जाणार असल्याचे नगर विकास ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी सोशल … Read more