Ahmednagar News : आता मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो; शास्त्रज्ञांनी शोधला मधुमेह पूर्णपणे बरा करण्याचा उपाय

Ahmednagar News : भारतासह जगभरात असा कोणताही देश नसेल ज्या देशात मधुमेह नसलेला रुग्ण सापडणार नाही. भारतात सध्या हा आजार मोठ्या वेगाने पसरत आहे. मात्र आता मधुमेह असलेल्या रुग्णासाठी याक चांगली बातमी आहे. चिनी शास्त्रज्ञांनी सेल थेरपीचा वापर करून रुग्णाचा मधुमेह पूर्णपणे बरा केला आहे. शांघाय चांगझेंग हॉस्पिटल, सेंटर फॉर एक्सलन्स इन मॉलिक्युलर सेल सायन्स, … Read more

Ahmednagar News : जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होणार असल्याचा महसूलमंत्र्यांना विश्वास

radhakrusn vikhe

Ahmednagar News : राज्यात महायुतीला अतिशय चांगले यश मिळणार असून, जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे मंत्री विखे पाटील यांनी महाअभिषेक करून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीच्या विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले, देशातील … Read more

Ahmednagar News : दुष्काळी पट्यातील शेतकऱ्याचे निर्यातीच्या क्षेत्रात यशस्वी पाऊल ; परदेशात निर्यात केला दहा टन केशर आंबा

Ahmednagar News : काहीतरी वेगळे करण्याची जिद्द, आत्मविश्वास व प्रतिकूलतेशी संघर्ष करण्याची तयारी ठेवल्यास हमखास यश मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील ऊसतोडणी कामगारांचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या पालवेवाडी येथील तोडणी कामगार असलेल्या संतोष शेषराव पालवे यांचे. या कुटुंबाने फळबागे सारख्या शेतीपूरक उद्योगात प्रचंड मेहनत व सेंद्रिय शेतीच्या जोरावर यावर्षी दहा टन … Read more

Ahmednagar News : ‘शिक्षक मतदार’ साठी इच्छुक असणारे डॉ. राजेंद्र विखे पाटील आहेत तरी कोण ? काय करतात ते …

Ahmednagar News : काही दिवसांपासून भाजपात असलेल्या विवेक कोल्हे आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटीलही शिक्षक मतदासंघ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही … Read more

Ahmednagar News : कॉलेजमधल्या मुलाकडून दुसऱ्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ काढून उकळले ४० हजार

Ahmednagar News

Ahmednagar News :  अहमदनगर शहरातून विविध गुन्हेगारी घटना समोर येत असतानाच आता एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या काही घटना ताजा असतानाच आता अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलासोबत केलेल्या या अनैसर्गिक कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. ते व्हायरल करण्याची धमकी देत ४० हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस … Read more

Ahmednagar politics : ‘बा’ विठ्ठला आता तुझाच आधार ! … एक्झिट पोलनंतर घालमेल? विखेंचे पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे

vikhe

Ahmednagar politics : लोकसभेच्या निकाल लागण्यास अवघे काही तास शिल्लक असताना एक्झिट पोलमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके हे आघाडीवर दाखवले आहेत. तर महायुतीमधील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे पिछाडीवर दाखवले गेले. एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर नगर भाजपमध्ये सन्नाटा पसरला आहे. मात्र याबाबत कोणीही पुढे येऊन प्रतिक्रिया द्यायला तयार … Read more

Ahmednagar News : स्टेअरिंग रॉड तुटून पाथर्डी-मुंबई बसचा अपघात : चालकासह ९ जण जखमी

Ahmednagar News : जिल्ह्यातील पाथर्डी आगाराच्या पाथर्डी-मुंबई या बसचा पुण्याजवळ अपघात होऊन चालक व आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. १) रात्री एक वाजता घडली. चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहक संभाजी जायभाय यांच्यासह सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ग्रामीण भागाची जीवनदाईनी … Read more

Ahmednagar News : कार्यकर्त्यांच्या नजरा निकालाकडे तर शेतकऱ्यांच्या पावसाकडे

Ahmednagar News : एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी अवघा एक दिवस उरला आहे. निवडणूक प्रशासनाची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे, तर प्रमुख पक्षांनीही आपले सक्षम प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात पाठविण्यासाठी नियुक्त केले आहेत. मतमोजणीत गैरप्रकाराची शंका असल्यास आक्षेप नोंदवून अंतिम निकालपत्रावर सही करायची नाही, अशा सूचनाही काही पक्षांनी आपल्या प्रतिनिधींना दिल्या असल्याचे समजते. मतमोजणी केंद्राच्या परीसरात कलम … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘त्या’ पोलिस ठाण्यासमोर चहाच्या टपरीवर पैशांची ‘देवाणघेवाण’, पोलिसासह टपरी चालकही अटकेत

lach

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने अद्यापपर्यंत अनेक कारवाया केलेल्या आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. थेट पोलिस ठाण्यासमोर चहाच्या टपरीवर लाच घेण्याचा प्रकार समोर आलाय. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे हवालदार रघुनाथ आश्रुबा खेडकर (वय ५५) याला १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. मुरुमाची वाहतूक करणारे … Read more

Ahmednagar News : खूनप्रकरणी कोठडीत असणारा आरोपी फरार, आधी उलटी केली नंतर.. पहा नेमका कसा घडला फिल्मी स्टाईल थरार

Ahmednagar News

शिर्डी येथील सागर शेजवळ हत्याकांड खूपच गाजले होते. या खून प्रकरणात आरोपी योगेश ऊर्फ गोट्या सर्जेराव पारदे (रा. कोल्हार खु, ता. राहुरी) हा कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृहात कोठडीत होता. शनिवारी रात्री एकच्या सुमारास त्याला रक्ताची उलटी झाली. पारदे याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना अंधाराचा फायदा घेत त्याने पोलिसांना चकवा देत तो फरार झाला. ही घटना … Read more

Ahmednagar News : एसटीचा खाजगी हॉटेल्स व ढाब्यांवरील थांबा; प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

Ahmednagar News : ‘प्रवाशांच्या सेवेकरिता’ असे ब्रीदवाक्य घेऊन घावणाऱ्या एसटीने ७६ वर्ष पूर्ण केले आहेत. एसटीचा प्रवास स्वस्त, सोयीचा व सुरक्षित असल्याने सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासाला पसंती देतात.सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवाशी दळणवळण सेवा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाची बस करीत आहेत. ७६ वर्षांपासून ते आजही ऊनवारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडीअडचणी, अडथळे, … Read more

Ahmednagar News : यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

Ahmednagar News : राज्याच्या विविध भागांत पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वारा, तसेच उष्ण व दमट हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. राज्याला मान्सूनच्या आगमनाचे वेध लागले असतानाच केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल सुरू असून, ४ जूनपर्यंत तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ … Read more

Ahmednagar News : परत राहुरी तालुका हादरला ; अज्ञात तरुणाची निर्घृण हत्त्या करून मृतदेह पिंपात टाकला

Ahmednagar News : वकील दाम्पत्याच्या हत्येनंतर राज्यात चर्चेत आलेला राहुरी तालुका पुन्हा एकदा एका अज्ञात तरुणाच्या निर्घृण हत्येमुळे हादरला आहे. बारागाव नांदूर शिवारातील मुळा धरणाच्या डाव्या कालव्यालगत अंदाजे ३५ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या छोट्या पिंपामध्ये पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. गेल्या आठवड्यातच शिंलेगाव शिवारात एका तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला होता. याचा तपास केला असता काही … Read more

खासदार सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारला इशारा; शेतकऱ्यांना सात दिवसात दिलासा द्या, अन्यथा

देशात शेतमालाला दर नसल्यामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. त्यात त्यांना दूध उत्पादनातून थोडाफार आर्थिक फायदा होत होता. मात्र, आता दुधाचे दर देखील सातत्याने कमी होत आहेत. उन्हामुळे दुधाच्या उत्पादनातही घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत असून दूध उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सात दिवसात निर्णय घेण्याचे आवाहन … Read more

Ahmednagar News : उन्हाचा फटका; कडू कारले, कोथिंबीर, मेथीसह मिरचीचा ठेचा महागला

bhajipala

Ahmednagar News : सध्या उन्हाचा पारा ४० अंशावर पोहचला असून नागरिकांना उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. तर दुसरीकडे महागाईचा वणवा भडकला आहे. त्यामुळे नागरिक सध्या उन्हासह महागाईच्या वणव्यात होरपळून निघत आहेत. महागाईने अगोदरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असून गेल्या दोन वर्षांपासून महागाईचा भडका वाढला आहे. दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. धान्यासह डाळी,मसाले आदी वस्तूंनी उच्चांक … Read more

Ahmednagar News : ‘लालपरी’ झाली तब्बल ७६ वर्षांची : लवकरच मिळणार ‘शिवाई’ची साथ

Ahmednagar News : तब्बल ७६ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लाल परी जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून धावत आहे. लाखो जणांच्या शिक्षणासाठी तिने हातभार दिला आहे. कोरोनामुळे या महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली होती. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून प्रवाशी संख्या वाढल्याने एसटी परत सुसाट धावत आहे. बदलत्या काळात खासगी प्रवाशी वाहतुकीचा फटका देखील एसटी महामंडळाला बसत आहे. खासगी … Read more

Ahmednagar News : जिल्ह्यात जलजीवनचा बोजवारा; रतनवाडीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला ‘हा’ इशारा

Ahmednagar News : ग्रामीण भागातील जनतेला नळ जोडणीच्या माध्यमातून शुध्द व स्वच्छ पाणी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन योजना आणली. सन २०२४ पर्यत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापुर्ण पाणीपुरवठा करण्याचे जल जीवन मिशनचे मुख्य उदिष्ट आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण ८३० पाणी योजनांसाठी १३३८ कोटींचा … Read more

Ahmednagar News : … तर आमच्याकडे या ! हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांना नगरकरांचे आमंत्रण

Ahmednagar News : पुण्यातील वाहतुकीची कोंडी आणि इतर समस्यांमुळे पुण्याच्या हिंजवाडी आयटी पार्कमधून ३७ कंपन्यांनी अन्य राज्यांत स्थलांतराचा निर्णय घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर पुण्यात अडचणी येत असतील तर या कंपन्यांनी राज्याबाहेर जाण्याऐवजी आमच्या अहमदनगर शहरात येण्याचा पर्याय निवडावा. अशी साद अहमदनगरकरांनी घातली आहे. तसेच यासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घेत योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध … Read more