Bombay High Court Recruitment : ४थी पास उमेदवारांना बॉम्बे उच्च न्यायालयात मिळणार नोकरी; फक्त होणार मुलाखत…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्हीही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “सफाई कामगार” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करा.

शैक्षाणिक पात्रता

या पदासाठी इयत्ता चौथी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे. जर उमेदवार इयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता उदा. १० वी १२ वी/पदवी प्राप्त असेल व त्याच्याकडे /तिच्याकडे इयत्ता चौथी चे गुणपत्रक नसेल तर त्याने/तिने अर्ज भरताना इयत्ता चौथी करिता काल्पनिकरित्या ५०% गुणांची नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रकान्यात करावी.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

यासाठी अर्ज शुल्क 200/- रुपये इतके आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१ ००९ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज 10 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://bombayhighcourt.nic.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील गरजेचे आहे.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच अर्ज देय तारखे अगोदर म्हणजेच 10 एप्रिल 2024 पर्यंत सादर करावेत.