ग्रामपंचायता निवडणूका शेतकऱ्यांच्या बोकांडी ! आचारसंहितेमुळे 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान रखडलं ; केव्हा मिळणार दुसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदान?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

50 Hajar Protsahan Anudan : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देणे हेतू गेल्या ठाकरे सरकारने अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. निर्णय ऐतिहासिक होता मात्र ठाकरे सरकारला याची अंमलबजावणी करता येणे शक्य झालं नाही.

शेवटी आता नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. प्रोत्साहनपर अनुदानाचा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यात पार पडला असून पहिल्या यादीतील कर यांना प्रत्यक्ष 50 हजार रुपयांपर्यंतच प्रोत्साहन पर अनुदान मिळाल आहे.

मात्र दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहन पर अनुदानाला आचारसंहितेचे ग्रहण लागल आहे. खरं पाहता राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका प्रगतीपथावर आहेत. यामुळे अनुदानाची दुसरी यादी खोळंबली आहे. अकोला जिल्ह्यात देखील निवडणुका आहेत यामुळे अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी लांबणीवर पडली आहे.

काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये येत्या पंधरा दिवसात म्हणजे ग्रामपंचायत निवडणुका पार पाडल्यानंतर अनुदानाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. निश्चितच गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रोत्साहन पर अनुदानाचा प्रश्न निकाली काढला गेला असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अनुदान मिळायला सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 33 हजार लाभार्थ्यांपैकी केवळ 9000 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.

या लाभार्थ्यांना 39.34 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. खरं पाहता, अकोला जिल्ह्यातील एकूण दहा हजार सातशे नियमित पीक कर्जाचे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे पहिले यादीत नाव आले होते. या शेतकरी बांधवांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला होता आणि आधार प्रमाणे करण करण्यास बंधनकारक करण्यात आले होते.

या अनुषंगाने दहा हजार 321 शेतकरी बांधवांनी आधार प्रामाणिकरण केले असून यातील आठ हजार 912 शेतकरी बांधवांना लाभ मिळालेला आहे. म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे अशा देखील काही शेतकरी बांधवांना अजून याचा लाभ मिळू शकलेला नाही.

मात्र लवकरच या शेतकऱ्यांना देखील लाभ दिला जाणार असून उर्वरित शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात अनुदान मिळणार आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने प्रोत्साहन अनुदानास उशीर होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. एकंदरीत ग्रामपंचायतचा निवडणुकीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.