Panjabrao Dakh: आला रे आला पंजाबरावांचा हवामान अंदाज आला..! आता दक्षिण महाराष्ट्रात पावसाची बॅटिंग, ‘या’ तारखेला पावसाची सुरवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh: राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भ आणि घाटमाथा परिसर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाची (Rain) उघडीप आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पूर्व विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात आणि महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) कोसळत आहे.

दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे (Monsoon News) राज्यात विशेषता विदर्भात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे संबंधित भागातील शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता राज्यातील पूरसदृश्य स्थिती हळूहळू मागे ओसरत आहे.

मात्र अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे पीक व्यवस्थापनाच्या कामात शेतकरी बांधवांना अडचणी येत आहेत. यामुळे काही भागातील शेतकरी बांधव पावसाची उघडीप होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आला आहे.

मित्रांनो शेतकरी बांधवांचा पंजाबराव (Panjabrao Dakh) यांच्या हवामान अंदाजावर मोठा गाढा विश्वास आहे. अशा परिस्थितीत आम्ही देखील शेतकरी बांधवांसाठी पंजाबरावांचा सुधारित हवामान अंदाज (Panjab Dakh Weather Report) नेहमीच घेऊन येत असतो.

पंजाबराव यांनी आपल्या सुधारित हवामान अंदाजात वर्तवलेल्या माहितीनुसार, आज 20 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. 20 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. मात्र सदर पाऊस हा भाग बदलत कोसळणार असल्याचे पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी स्पष्ट केले आहे.

23 ऑगस्टनंतर मात्र पावसाची उघडीप राहणार आहे. 23 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार असून या कालावधीत पावसाची उघडीप सर्वत्र राहणार आहे. यामुळे 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची कामे तसेच पीक व्यवस्थापनाची कामे करून घ्यावीत असे देखील पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

26 तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. पंजाबराव यांच्या मते 27 ऑगस्टपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान, राज्यात विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.

दक्षिण महाराष्ट्रात म्हणजेच मराठवाड्याचा काही भाग, सांगली, सातारा इत्यादी दक्षिण महाराष्ट्रातील भाग पावसामुळे प्रभावित होणार आहेत. एकंदरीत पूर्व विदर्भात सुरू असलेला पाऊस आता दक्षिण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.