एक कप चहामुळे होऊ शकतो कॅन्सर; वाचा यामागचे कारण…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cancer : जगभरात दरवर्षी कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. सर्व वयोगटातील लोक या आजाराला बळी पडताना दिसत आहेत. तसेच या आजारामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू देखील होत आहे. कर्करोग अनेक कारणांमुळे होतो. अशातच महिलांमध्ये याचे जास्त प्रमाण जास्त आहे. कर्करोग होण्यामागची अनेक करणे आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल रोज एक कप चहा देखील तुम्हाला कॅन्सरचा बळी बनवू शकतो.

होय, जर तुम्ही प्लास्टिकच्या कपमध्ये चहा प्यायला आणि दररोज असे करत असाल तर तुम्हाला कॅन्सरची लागण होऊ शकते. कारण या प्लास्टिकच्या कपांमध्ये हायड्रोकार्बन्स असतात. या कपांमध्ये चहा गेल्यावर हा धोकादायक हायड्रोकार्बन चहामध्ये मिसळतो. जेव्हा आपण चहा पितो तेव्हा तो शरीरात पोहोचतो, ज्यामुळे नंतर कर्करोग होण्याची शक्यता असते.

गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिण्याचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. विशेषतः दुकाने किंवा टपरी, हॉटेल येथे चहा प्लास्टिकच्या कपमध्येच दिला जातो. तुमच्या माहितीसाठी जेव्हा प्लास्टिकचे भांडे गरम केले जाते तेव्हा त्यातून हायड्रोकार्बन्स बाहेर पडतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका संभवतो.

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्येही असाच धोका आहे. यामध्ये पाणी जास्त काळ राहिल्यास ते प्लास्टिकमध्ये असलेल्या हायड्रोकार्बन्सच्या संपर्कात येते. जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा ते त्यातून शरीरात प्रवेश करते. प्लॅस्टिकच्या बाटलीत डायऑक्सिन रसायन असल्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

केवळ चहाच नाही तर रात्री उशिरा खाल्ल्यानेही कर्करोग होऊ शकतो. एका संशोधनानुसार खाणे आणि झोपणे यामध्ये दोन तासांचे अंतर असावे. पण आजकाल लोक रात्री उशिरा अन्न खातात आणि ते खाल्ल्यानंतर लगेच झोपी जातात. त्यामुळे जेवण आणि झोप यात अंतर राहत नाही. अशा स्थितीत शरीराचे जीवन चक्र बिघडते. खराब जीवनशैलीमुळे शरीरातील पेशींची असामान्य वाढ होण्याचा धोका असतो. पेशींच्या या वाढीमुळे कर्करोग होण्याचा धोका असतो.

कॅन्सरचा वाढता धोका लक्षात घेता लोकांमध्ये याची जनजागृती करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. आजही बहुतांश लोकांना कॅन्सरची तपासणी कधी करावी, याची माहिती नसते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हा रोग वर्षानुवर्षे शरीरात विकसित होत राहतो आणि लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. उपचार सुरू होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. या कारणास्तव, कर्करोगाची बहुतेक प्रकरणे प्रगत अवस्थेत नोंदवली जातात. अशा परिस्थितीत कर्करोगाबाबत लोकांमध्ये जागरुकता असणे गरजेचे आहे.