राज्यसभा निवडणूक : दीड तासातच पन्नास टक्के मतदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rajya Sabha Election 2022 : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीसाठी वेगाने मतदान सुरू आहे. पहिल्या दीड तासात ५० टक्के मतदान पूर्ण झाले आहे. १४३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

राष्ट्रवादीच्या २०, भाजपच्या ६० तर काँग्रेच्या २३ आमदारांनी आतापर्यंत मतदान केले आहे. इतरही आमदारांचे मतदान सुरू आहे.मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळणार की नाही?

थोड्याच वेळात मुंबई हायकोर्टात मलिक यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मलिक यांच्यासाठी ज्येष्ठ वकील अमित देसाई हे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर युक्तिवाद करणार आहेत.