महावितरणच्या अधिकाऱ्यांची ‘ या’ आमदारांकडून खरडपट्टी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- विजेच्या बाबत अनेक नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी येत असून आपल्या कामात सुधारणा न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा ईशारा देऊन काम करायचे नसेल तर बदली करून घ्या असा शब्दात आ.काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

कोपरगाव येथे गौतम बँकेच्या सभागृहात आ. आशुतोष काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विजेच्या विविध अडचणींसंदर्भात आढावा घेतांना अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. कोपरगाव शहर व मतदारसंघात नागरिकांना विजेच्या बाबतीत अनंत अडचणी येत आहेत.

कमी दाबाने होणारा वीजपुरवठा, वारंवार जाणारी वीज व अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे रखडली आहेत. नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी अनेक रोहित्र मंजूर केले आहेत. मात्र रोहित्र उभारणीचे काम घेतलेले ठेकेदार वेळेत काम पूर्ण करीत नसल्यामुळे अडचणींमध्ये भर पडत आहे.

अशा ठेकेदारांवर महावितरण कारवाई का करीत नाही? असा सवाल करून या ठेकेदारांना अभय न देता हे ठेकेदार काळ्या यादीत टाका. शेतकरी व नागरिकांना येत असलेल्या विजेच्या समस्या लवकरात लवकर सोडवा. दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून नवीन मंजूर झालेले

रोहित्र लवकरात लवकर बसवा यापुढे नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या अन्यथा त्याचे गंभीर परिणाम संबंधित अधिकाऱ्याला भोगावे लागतील अशी तंबी आ.काळे यांनी उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली.

यावेळी यावेळी महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश मुळे, राहाता विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, अभियंता शिरीष वाणी, अति.

कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राष्ट्रवादीचे राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ आदी उपस्थित होते