बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना जामखेड तालुक्यात घडली आहे.

जामखेड तालुक्यातील आरणगाव येथील कारंडे येथील अनिकेत विठ्ठल बांगर (वय २०) याने शनिवारी दुपारी चार वाजण्यापूर्वी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही . संतोष निगुडे यांनी जामखेड पोलीस स्टेशन ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल हिंगसे करत आहेत.