दुसऱ्यांची कामे आपल्या नावावर खपविण्याचे बोगस धंदे आम्ही कधीच केले नाहीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत ज्या कामांची भूमिपूजने केली ती फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत. याचा हिशेब घेऊनच आम्ही आगामी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत.

दुसऱ्यांची कामे आपल्या नावावर खपविण्याचे बोगस धंदे आम्ही कधीच केले नाहीत. अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली.

नगर शहर बाह्यवळण मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची सुरुवात रविवारी वाळुंज येथे विखे यांच्या हस्ते झाली. यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.

४० किलोमीटर अंतराच्या १ हजार २६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. यावेळी बोलताना विखे म्हणाले, इतके वर्षे राजकारण पाहतो. मात्र, आघाडी सरकार आल्यापासून प्रथमच डीपीचे उद्घाटन करायला मंत्री येतात.

१० लाखांच्या कामासाठी १० तास भाषणे ठोकतात. जाहिरातबाजी, शोबाजी करण्यात आम्ही कमी पडतो. रेमडेसिविर इंजेक्शनचा साधा फोटो काढला तरी आमच्या वाट्याला कोर्टबाजी आली.

मात्र, जिल्ह्याचे राजकारण जाहिरातबाजीवर चालत नाही. त्यासाठी काम करावे लागते. तसेच फडणवीस सरकारने मंजूर केलेल्या कामांचे उद्घाटन सध्या महाविकास आघाडी सरकार करत आहे.

केंद्राचे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील पैसे व्याजाने घेऊन त्यांनी रुग्णवाहिका घेऊन हे सरकार शोबाजी करीत आहे. इतकी लाचारी आघाडी सरकारने चालविली आहे. याचा सारा हिशेब घेऊन आगामी निवडणुकीत येणार आहे, अशी टीका खासदार विखेंनी केली.