राज्यात समान नागरी संहिता लागू होणार? मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jayaram Thakur) यांनीही देशात कायदा लागू करण्यास पाठिंबा दिला आहे. त्यांनी समान नागरी संहितेचे कौतुक केले आहे.

इतकेच नाही तर हिमाचल प्रदेशात याची अंमलबजावणी करण्याचा विचार करणार असल्याचे सीएम जयराम ठाकूर यांनी म्हटले आहे. मात्र यामध्ये कोणतीही घाई होणार नाही.

हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांपूर्वी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) समान नागरी संहितेची चर्चा झाली होती. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याचा उल्लेख केला होता.

आता पुन्हा भाजपने (Bjp) राज्यात (State) सरकार स्थापन केले आहे. आता सीएम धामी यांनी समान नागरी संहिता लागू करण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे.

उत्तराखंडपाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही त्याचा सुगंध दरवळला आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले होते की, उत्तर प्रदेश सरकार समान नागरी संहितेवर गांभीर्याने विचार करत आहे.

बिहारमध्येही याबाबत खळबळ उडाली आहे. मात्र, तिथे भाजप आणि जेडीयू यावरून आमनेसामने आहेत. वास्तविक, भाजपने समान नागरी कायदा आपल्या अजेंड्यावर ठेवला आहे.

दुसरीकडे, जेडीयूच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी म्हटले आहे की, देश हा विविधतेने भरलेला देश आहे, ज्यामध्ये छेडछाड करण्याची गरज नाही. त्यामुळे जे चालले आहे ते चांगले आहे.