अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेतून भाजपकडून डॉ सुजय विखे आणि राष्ट्रवादी कडून आ.संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर होतात भाजप आमदार आणि जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर असणारे आ.शिवाजीराव कर्डिले धर्म संकटात पडले होते.

पक्षाने दिलेल्या उमेदवाराच काम कराव कि जावई संग्राम जगताप हा प्रश्न त्यांच्या समोर पडला,आजवरच्या नगर शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात कर्डिले पक्षापेक्षा सोयीचे राजकारण करण्यात ‘पटाईत’ होते.

आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम म्हणून या विधानसभा निवडणुकीकडे बघितले गेले. भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे आता खासदार झाले.
लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना दक्षिणेतील सर्व तालुक्यात सर्वाधिक लीड हे राहुरीतूनच मिळाले असल्याने आता मात्र आ.कर्डिले यांनी या निवडणुकीत स्वताच्या राजकीय भविष्याच विचार केल्याचे दिसुन आले आहे.

आमदार शिवाजी कर्डिलेंच्या पुढील राजकीय वाटचालीस यामुळे सुकरता येणार आहे.आमदार शिवाजी कर्डिलेंच्या निवडणूक भुमिकेवरील साशंकतेचे सावट या मोठ्या मताधिक्याने निश्चितच दूर होईलच. त्यांचे पक्षातील वजन या मताधिक्याने व निवडणुकीतील त्यांचे भूमिकेने निश्चितच वाढेल.
आमदार शिवाजी कर्डिंलेचे काही कार्यकर्ते आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर होते. याचा अर्थ आमदार कर्डिलेंनीच त्यांना तसे करावयास सांगितले आहे. ते देखील आतून सहकार्य करतील, असे सांगितले गेले. वास्तवात तसे झाली नाही. परिणामी विखेंचा वारु सुसाट सुटला.
- अहिल्यानगरमध्ये पैश्यांसाठी सराफा व्यापाऱ्याच्या मुलाच्या डोक्याला लावली पिस्तुल तर बायकोचाही केला विनयभंग, ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
- अहिल्यानगरमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार २७ जुलै रोजी अनावरण
- महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी होणार एक्झाम? पहा…
- कोपरगावमध्ये सोन्याच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या मकोका आरोपींना छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाने केला जामीन मंजूर
- ढोल-ताशा पथक ही आपली संस्कृती आहे, अहिल्यानगरमधील वाद्यपथकाच्या सराव प्रारंभप्रसंगी आमदार संग्राम जगतापांचे प्रतिपादन