निळवंडेच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही : आमदार बाळासाहेब थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : अनेक अडचणीवर मात करून आपण दुष्काळी भागातील जनतेसाठी निळवंडे धरण पूर्ण केले आहे. आपल्याच कार्यकाळात कालव्यांची कामे पूर्ण झाली असून फक्त पाणी सोडणे बाकी होते. परंतु श्रेयासाठी पाणी उशिरा सोडले गेले.

सध्या निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी आपला सातत्याने प्रयत्न आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे आयोजित कार्यक्रमात नुकतेच ते बोलत होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून प्रत्येक गावच्या वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठीच्या मंजूर ७७ कोटींच्या निधीला या सरकारने स्थगिती दिली होती.

सुप्रीम कोर्टात जाऊन ती स्थगिती उठवली आहे. येत्या काळात रस्त्यांची कामे पूर्ण होतील. आपण कधीही कुणाचे वाईट केले नाही. चांगले काम करणे ही आपली परंपरा आहे. काही महिने अडचणीचा काळ असला तरी आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. तांबे म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आमदार बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. निळवंडे धरण व कालव्यांची कामे त्यांनीच पूर्ण केली असून तेच पाणी देणार आहेत.

काही लोक या कामाचे श्रेय घेऊ पाहत आहे. परंतु जनता त्यांना ओळखून आहे. देवकौठे गावाने कुकूटपालन व दुग्ध व्यवसायातून मोठी आर्थिक क्रांती केली असून हे काम इतरांसाठी आदर्शवत असल्याचेही ते म्हणाले.

नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, सुवासिनींकडून औक्षण, फटाक्यांची आतिषबाजी, पारंपारिक वाद्य, लेझीम पथक, भव्य दिव्य मिरवणूक आणि अलोट गर्दीत जेसीबीतून फुलांची उधळण करत देवकौठे ग्रामस्थांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, सचिन दिघे, अनिल कांदळकर, दूध संघाचे संचालक भारत मुंगसे, नाशिक मनपाचे नगरसेवक भागवत आरोटे, उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष इंजि.

सुभाष सांगळे, एकनाथ मुंगसे, राजेंद्र कहांडळ सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुंगसे, प्रभाकर कांदळकर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, नवनाथ अरगडे, सखाराम शरमाळे, राजेंद्र मुंगसे, मच्छिद्र सांगळे, अनिल गाजरे, ज्योती मोकळ, जिजाबाई मुंगसे, तुकाराम दिघे, भास्कर खेमनर, बाळासाहेब दिघे, आत्माराम जगताप आदी उपस्थित होते